वालचंदनगर ता. 17 : वालचंद्रनगर येथील कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत व कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळात 12 डिसेंबर रोजी प्रश्न उपस्थित केला होता. . याबद्दल आज या कंपनीतील कामगारांनी श्री भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन श्री भरणे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.
विधिमंडळात श्री भरणे यांनी कामगारांच्या हितासाठी तत्काळ कंपनी प्रशासन कामगार मंत्री व पालकमंत्री यांची बैठक कामगारां समवेत बैठक घ्यावी. व कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी यावेळी विधिमंडळात केली. यावर लवकरच बैठक घेतली जाईल. असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नाबाबत विधिमंडळात आमदार भरणे यांनी आवाज उठवल्याने तालुक्यातील जनतेतून व कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हे कामगार समाधान व्यक्त करून थांबले नाहीत तर आज भरणेवाडी येथील निवासस्थानी जाऊन श्री भरणे यांचा सत्कार केला. व आभार मानले. यावेळी श्री भरणे यांनी जनतेचे व कामगारांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्यच आहे. या पुढील काळातही आपण जनता व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. असेही यावेळी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील उपस्थित होते.