भिगवन या. 22 : खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडावे. अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार आहे. असा इशारा सिद्धेश्वर निंबोडी तालुका बारामती गावचे सरपंच संतोष सोनवणे यांनी दिला आहे.
खडकवासला कालव्याच्या वितरिका क्रमांक 36 आणि मदनवाडी तलावाच्या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
परिसरातील विहिरी आणि विंधन विहिरी पाणी पातळी कमालीची घटली आहे.
मदनवाडी तलावावर पारवडी निंबोळी शेटफळकडे स्वामी चिंचोली मदनवाडी आणि पिंपळे या सहा गावचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.
याच तलावात लगतच निंबोडी आणि मदनवाडी ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत त्यामुळे मदनवाडी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ पाणी सोडणे गरजेचे आहे.
मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या व्यतिरिकेला पाणी सोडण्यात यावे. याबाबतची निवेदने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सरपंच संतोष सोनवणे यांनी दिली.







