विनायक चांदगुडे
पुणे ता. 1 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोट निवडणुकीत बारामती विधानसभा मतदार संघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देशातील पार पडलेल्या आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे स्थापित असलेले मताधिक्याचे विक्रम मोडत देशात सर्वाधिक मतांनी विजयी होणार आहेत. चौफेर न्यूज ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशात 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवाराला 2 लाख 14 हजार 835 मताचे मताधिक्य मिळाले आहे. हेच देशात एक नंबरचे सध्या मताधिक्य आहे.
परंतु आता 4 मे रोजी मतमोजणी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून देशात सध्या असलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तोडला मोडला जाणार आहे व सुनेत्रा पवार यांचे हेच मताधिक्य यापुढे देशात क्रमांक एकचे राहणार आहे.
23 एप्रिल रोजी पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतील 3 लाख 84 हजार 519 मतदारापैकी 2 लाख 24 हजार 87 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
जवळपास 22 उमेदवार व एक नोटा असे पर्याय मतदारांपुढे होते यापैकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदान करण्यास सर्वाधिक मतदारांनी संमती दिली आहे अशीही बाब मतदारांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
त्यामुळे सुनेत्रा पवार यांना जवळपास 2 लाख 17 हजार ते 2 लाख 18 हजार मतदान मिळण्याचा अंदाज असून त्यांच्या खालोखाल विरोधी उमेदवाराला 700 ते 1 हजारापर्यंत मतदान मिळण्याचा अंदाज आहे. अशी बाब मतदारांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या देशात सर्वाधिक मतांनी विजयी होणार आहेत.
यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा केलेला विकास , दादांच्या निधनानंतरची सहानभूती , सर्व दुःख विसरून सुनेत्रा पवार यांनी जनतेसाठी नव्याने सुरू केलेला राजकीय प्रवास व सुरू ठेवलेला जनसंपर्क विकासाची व जनतेची सुरू ठेवलेली कामे , यापूर्वी केलेले सामाजिक काम , पवार कुटुंबीयांचा पाठिंबा , खासदार पार्थ पवार व जय पवार यांनी प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन केलेले निवडणुकीचे नियोजन व राबवलेली प्रचार यंत्रणा , मित्र पक्षाची मदत ,पक्ष संघटनेतील व संस्थांवरील पदाधिकारी तसेच गावो गावच्या कार्यकर्त्यांनी कडक उन्हाळ्यातही घडवून आणलेले मतदान यामुळे हे शक्य झाले आहे.







