शेटफळगढे ता.3 : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीचे रिंगेचे काम सुरू असताना विहिरीची रिंग कोसळून बेलवाडी येथील चार मजूर गाडले गेले आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते आज गुरुवारी सकाळीही त्यांच्या शोध कार्याला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी दुपारी पाच वाजता सुमारास घटना घडली असा अंदाज आहे मात्र मजूर घरी परत येत नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली अखेरीस मंगळवारी रात्री नऊ वाजता आमदार दत्तात्रय भरणे यांना मजुरांच्या नातेवाईकांनी संपर्क केला. त्यानंतर श्री भरणे यांच्या सूचनेनुसार तत्काळ रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास 210 अश्व शक्तीच्या पाच मशीन ढिगारा हटविण्यासाठी अनिकेत भरणे व सचिन सपकाळ यांनी उपलब्ध केल्या. व मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून मुरमासाठी घर हटवण्याचे काम सुरू झाले आहे विहिरीची खोली ही जवळपास 90 ते 100 फूट व गोलाई दीडशे फूट आहे.
त्यानंतर माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलिस अधिकारी यांना मंगळवारी रात्रीच सूचना दिल्या. त्यानुसार बुधवारी सकाळीच एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले आहे
बुधवारी दिवसभर हे काम चालू होते स्वतः माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत थांबून होते त्याचबरोबर सर्व शासकीय पोलीस अधिकारीही थांबून होते. मात्र मुरमाचे प्रमाण जास्त असल्याने व विहिरीच्या सोबतचा परिसर ठिसूळ झाल्याने उर्वरित रिंगही पुढे सरकली आहे त्यामुळे या पुढील काळात आणखी कोणाच्याही जीविताला धोका पत्करायला नको म्हणून मुरमाचा ढिगारा हटविण्याचे काम आज गुरुवारी सकाळपासून सुरू आहे
त्यासाठी यंत्रसामग्री सोडण्यासाठी पुण्यावरून यंत्रसामुग्री विहिरीत सोडता येईल अशा पद्धतीच्या क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तसेच विहिरीतील पाणी काढण्यासाठी मोटार सोडण्यात झाल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत चार मजुरांचा शोध पूर्ण होईल असा अंदाज आहे.
————————————