खालापूर, ता. 20 : मागील सलग 48 तास सुरु असलेल्या संततधार पावसामुळे इर्षाळगडाच्या पायथ्याला असलेल्या इरशाळवाडीतील 17 हून अधिक घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून पन्नास हून अधिक जणीच्या ढिगायाखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे इरशाळगडाच्या डोंगरावरील सैल झालेली माती आणि दगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील घरांवर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले.
दुर्घटनाग्रस्त ठिकाण हे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबी धरणाच्या परिसरात आहे. इरसालवाडी जवळपास 48 घरे असल्याची माहिती मिळते
दुर्घटना घडल्याची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन विभागाची दोन पथके आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र पाऊस चालू असल्याने उंचीवरील भाग असल्याने व तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत कार्य करण्यात अडथळा येत आहे तरीही युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत 80 जणांची सुटका करण्यात आतापर्यंत यश आले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेऊन प्रशासनाला बचाव कार्यासाठी स्वतः सूचना देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत