शेटफळगढे ता.. २५ : पावसाने ओढ दिल्याने इंदापूर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गतवर्षी तालुक्यात 23 हजार 204 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र यावर्षी या क्षेत्रामध्ये घट होऊन केवळ 21 हजार 72 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे जवळपास तालुक्यात 2 हजार 132 हेक्टर क्षेत्रावर कमी पेरणी झाली आहे.
तालुक्यात बाजरी व मका !या दोन पिकासाठी 13 हजार 458 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती त्यामध्ये मका 12 हजार 717 व बाजरी 736 हेक्टर आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने ही पिके धोक्यात आली आहे
याबरोबरच सोयाबीन 220 हेक्टर व चारा पिके 2025 हेक्टरवर पेरणी झाली होती पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होऊन देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरीचे पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना विहिरीचे पाणी देणे देखील शक्य झाले नाही परिणामी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत मात्र काही ठिकाणी कालव्यालगत असलेली पिके काही प्रमाणात वाचली आहेत मात्र येत्या तीन-चार दिवसात पाऊस न पडल्यास संपूर्ण हंगामच वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पेरणी केली मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे
तालुक्यात सर्वाधिक मका व बाजरीची लागवड भिगवन मंडलात झाले आहे या मंडळात शेटफळगढे, निरगुडे ,म्हसोबाची वाडी ,पिंपळे, अकोले ,पोंधवडी, वायसेवाडी, इत्यादी गावांचा समावेश असून या भागातील खडकवासल्याच्या कालव्याच्या आवर्तनामुळे कालव्यावर अवलंबून असलेली काही पिके वाचली आहेत खरीप बरोबरच या परिसरात दरवर्षी ऊस लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र लागवडीवरही परिणाम झाला असून सुमारे 50 टक्के लागवड दरवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे त्याचा परिणाम साखर कारखान्यांवरही होणार आहे चालू हंगामाचा ऊस चारा पिकासहित मोठ्या प्रमाणात जात असल्याने गाळपाचे प्रमाणही कमी होणार आहे त्यामुळे गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
———————————–