खालापूर, ता. 20 : इरसालवाडी (ता. खालापूर जि. रायगड) येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत .16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 21 जणांना वाचविण्यात यश आले. आहे . मातीच्या डिगाराखाली आणखी 70 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या अंधार पडू लागल्याने मदत व बचाव कार्यात अडथळा येत आहे त्यामुळे मदत कार्य थांबवण्यात आले असून शुक्रवारी सकाळी पुन्हा सहा वाजता या बचाव कार्याला सुरुवात केली जाणार आहे.
बुधवारी रात्री 48 कुटुंब राहत असलेल्या या इरसालवाडी गावावर रात्री साडेदहाच्या सुमारास या गावावर भूस्खलनामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाराखाली संपूर्ण गाव गाडले गेले.
त्यानंतर याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासन व राज्य सरकारनेही मदत व बचाव कार्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.
दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाची दोन पथके आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र पाऊस चालू असल्याने उंचीवरील भाग असल्याने व तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत कार्य करण्यात अडथळा येत आहे .
तरीही युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे..
अंधार अंधार पडू लागले नाही मदत व बचाव कार्य थांबविण्यात आले असून शुक्रवारी 21 जुलैला पुन्हा सकाळी सहा वाजता मदत व बचाव कार्य सुरू केले जाणार आहे. .
विशेष बाब म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पहाटे साडेतीन वाजता तर त्यानंतर लगेचच मंत्री उदय सामंत हे दोघेही घटनास्थळी पायी जाऊन दाखल झाले होते. त्यामुळे पहाटेपासूनच मदत व बचाव कार्याला प्रशासनाच्या मदतीने सुरुवात केली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी स्वतः दुपारी पाऊलवाटेने पायी घटनास्थळी जात दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत हे घटनास्थळी थांबूनच असल्याने प्रशासनाच्या मदतीने तत्काळ मदत व बचाव कार्याला गती देता आली . त्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे.