शेटफळगढे ता.14 : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन 13 दिवस चालणार आहे.
यापूर्वी तालुक्यात सोडण्यात आलेल्या वर्तन केवळ सात दिवस चालले होते यासंदर्भात ‘चौफेर न्यूज’ ने ‘धरणे फुल पण सात दिवस आवर्तन मिळूनही तालुक्यातील आजी माजी नेते मात्र कुल’ असे आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सोडले आहे.
सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती होती . उसाच्या लागणी देखील झालेले नव्हत्या. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले होते. मात्र सध्या खडकवासला धरणामध्ये जवळपास 90 टक्के पाणी झाले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी 11 ऑगस्टपासून आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन तालुक्यात नुकतेच पोचले आहे.
मात्र तालुक्यात हे आवर्तन यापुढे 13 दिवस राहणार आहे. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी टेल टू हेड पद्धतीने पाणी दिले जाणार आहे.. या 13 दिवसानंतर कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या दौंड व बारामती तालुक्यातही पाऊस नसल्याने या दोन्ही तालुक्यात पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा व धरण पाणलोट क्षेत्रातील पडणारा पाऊस विचारात घेतला जाणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास इंदापुरातील आवर्तनाच्या कालावधीत एक दोन दिवसाची आणखी वाढ होणार आहे मात्र पावसाने उघडीप दिल्यास अथवा पाऊस न झाल्यास मात्र 13 दिवसाचेच आवर्तन तालुक्यात राहणार आहे
त्यानंतरच इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या अंकित येणाऱ्या पाझर तलावात पाणी सोडावयाचे की नाही याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे.
——————————-