शेटफळगढे ता.13 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथील विहीर दुर्घटनेत आमदार दत्तात्रय भरणे हे खरोखरच नेहमीप्रमाणे इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येतात. याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. त्यामुळे राज्यासह तालुक्यातून श्री भरणे यांच्यावर कौतुकाच्या वर्षाव होतं आहे.
एक ऑगस्ट रोजी बेलवाडी येथील चार मजूर म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम करण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान हे मजूर रात्री उशिरा घरी परत न आले नाहीत. कारण का तर ते विहिरीची रिंग कोसळून मुरमाच्या ढिगार्याखाली गाडले गेले होते.ही गोष्ट या मजुरांच्या कुटुंबीयांनी तत्काळ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगितले घटनेचे गांभीर्य ओळखून श्री भरणे यांनी रात्री साडेनऊ वाजता तत्काळ आपले पुतणे अनिकेत भरणे व राष्ट्रवादीचे नेते सचिन सपकाळ यांना घटनास्थळी पाठवले. त्याच दिवशी रात्री 210 सोशक्तीच्या पाच मशीन विहिरीच्या रिंग कोसळलेल्या ठिकाणी श्री भरणे यांच्या सूचनेनुसार आणण्यात आल्या. रात्री एक वाजता कामाला सुरुवात झाली . हे करीत असताना श्री भरणे यांनी जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन महसूल विभाग यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सर्व यंत्रणा श्री भरणे यांनी कामाला लावली.
दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्टला श्री भरणे यांच्या सूचनेनुसार एन डी आर एफ ची पथके घटनास्थळी दाखल झाली स्वतः श्री भरणे हे पाच वाजून वीस मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. सर्व माहिती घेतली व जवळपास साडेचार वाजेपर्यंत घटनास्थळी ते थांबून राहिले.तसेच घटनास्थळापासून गेल्यापासून श्री भरणे हे मुक्कामाला विहिरीवरस असणाऱ्या व गाडीत घटनास्थळी केवळ दोन तास रात्री झोपणाऱ्या सचिन सपकाळ व अनिकेत भरणे यांच्या संपर्कात होते. त्यानंतर तीन ऑगस्टला या दोघांच्या बरोबरच प्रत्येकी अर्ध्या तासाला श्री भरणे प्रशासनाकडूनही माहिती घेत होते. व आवश्यक तेथे प्रशासनाला सूचना देत होते.
तीन दिवसापासून विहिरीत मुरमाच्या ढिगाराखाली गाडले गेलेल्या मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते यासाठी स्वतः अनिकेत भरणे सचिन सपकाळ यांचे सह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत होते. अखेरीस चार ऑगस्टला सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. हे सर्व म्हसोबावाडीत सुरू असताना श्री भरणे यांनी मुंबईत चार ऑगस्टला विधिमंडळात अधिवेशनादरम्यान या मजुरांना मदत मिळण्यासंदर्भात मागणी केली. श्री भरणे यांनी केलेली मागणी विचारात घेऊन विधिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मजुरांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे घोषित केले.
अवघ्या सात दिवसात श्री भरणे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत खेंगरे व अनिकेत जाधव यांना या संदर्भातील पाठपुरावा व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. अखेरीस या सर्वांच्या प्रयत्नातून केवळ सात दिवसात शासनाच्या मदतीचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश 11 ऑगस्टला श्री भरणे यांच्या हस्ते बेलवाडी येथे या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला.
त्यामुळे खऱ्या अर्थाने तालुक्यातील जनतेला गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा नेता केवळ श्री भरणे मामाच आहेत. याची पुन्हा एकदा प्रत्यक्षात प्रचिती आली. त्यामुळे त्यांच्यावर तालुक्यासह राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे